
वादळवाऱ्यामुळे आगीने केले रौद्र रूप धारण, जीवितहानी नाही…
अमळनेर : तालुक्यातील सात्री येथे खळ्यात आग लागल्यानंतर अचानक घरांनी पेट घेतला. आगीत चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत. नागरिकांचा प्रचंड आक्रोश सुरू आहे. एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग अधिकच वाढली आहे.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी लागलीच दखल घेत अग्निशमन बंब रवाना केले आहेत. नगरपरिषदेचा बंब, व इतर एक बंब पोहचले असून पारोळा ,चोपडा ,धरणगाव येथून देखील गाड्या मागवण्यात आल्या आहेत. ग्रामस्थ आपल्या परीने आग विझवण्यासाठी मिळेल त्या साधनांनी आटोकाट प्रयत्न असून आजूबाजूच्या गावातील नागरिक ही मदतीला धावले आहेत. अजून एक बंब पोहोचल्यास मध्यरात्रीपर्यंत आग आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

