
अमळनेर:- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती अमळनेरची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा.नरेंद्र राजाराम सोनवणे यांची निवड करण्यात आली.

साहित्य भारतीचे देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पाटील यांनी आगामी वर्षासाठी कार्यकारिणीची घोषणा केली. नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष – प्रा.नरेंद्र सोनवणे,उपाध्यक्ष – प्रा.सागर सैंदाणे, सौ.करूणा सोनार कार्याध्यक्ष – विवेक जोशी, सचिव – मंगेश काळकर, सहसचिव – दिपक खोंडे, कोषाध्यक्ष – आशिष चौधरी, प्रसिद्धी प्रमुख – मिलिंद वारूळे सहप्रमुख – सारंग गर्गे, सोशल मिडीया प्रमुख – तुषार सैंदाणे,उपक्रम समिती सदस्य – प्रकाश शिवाजी पाटील,सौ.रेखा मराठे,कार्यकारिणी सदस्य – जे.डी.निकुंभ,मिनाक्षी बारी,दत्ता सोनवणे,केतन अनिल जोशी, सौ.योगिता शिरिष डहाळे, सौ.सरिता एन.कुळकर्णी, सल्लागार – प्रा.एन.के. कुळकर्णी, कवी श्री प्रकाश पाटील,विशेष निमंत्रित – दिनेश नाईक,शैलेश काळकर,जे.के.चौधरी. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे साहित्य भारतीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्राचार्य नरेंद्र पाठक,प्रदेश संघटनमंत्री नितीन केळकर,सहसंघटनमंत्री शशिकांत घासकडबी,प्रांताध्यक्ष दत्ता जोशी,कार्याध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पाटील,प्रांत मंत्री प्रा.डॉ.विजय लोहार,विभाग संयोजक दिनेश नाईक, जिल्हाध्यक्ष प्रा.शरदचंद्र छापेकर यांनी अभिनंदन केले आहे.




