
अमळनेर : शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या मोटरसायकल ला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्याने पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले होता मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
तालुक्यातील गडखांब येथील मुरलीधर राजाराम पाटील व लता मुरलीधर पाटील हे दोघे मोटरसायकलवर शेतात दहिवद कडे जाताना समोरून चोपड्याकडून अमळनेर कडे येणाऱ्या यावलच्या बस क्रमांक एम एच २० बी एल २६५६ ने जोरदार धडक देऊन मोटरसायकलसह पती पत्नीला तब्बल ५० ते ६० फूट ओढून नेले. मोटरसायकल बस खाली आल्याने लताबाई गंभीर जखमी झाल्याने तिला धुळ्याला हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर मुरलीधर यांना अमळनेर येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे.

