
सामाजिक एकात्मतेचे घडले दर्शन
अमळनेर – अमळनेर नगरीतील संत सखाराम महाराज संस्थानचा रथोत्सव काल दि.8 मे रोजी रात्री एकादशीला पार पडला.सायंकाळी 7 वाजता विधिवत पूजा करून रथोत्सवास सुरुवात झाली.

सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून अमळनेरच्या रथोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. सायंकाळी 7 वा. वाडी संस्थान मधून रथोत्सवास सुरुवात झाली. रथामध्ये श्री लालजींची मूर्ती ठेवली होती. परंपरेनेप्रमाणे रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम बांधवास मिळाला,असंख्य भाविकांनी दोर ओढून रथ वाडी चौक पर्यंत मार्गस्थ केला. वाडी चौक येथून सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी पूल पैलाड मार्गे हा रथ सकाळी ६ वाजेला वाडी संस्थानात दाखल होण्याचे नियोजन होते. रथाच्या मागे प.पू. प्रसाद महाराज अनवाणी पायी चालत होते. रथोत्सव पाहण्यासाठी महिला व पुरुष बांधवांची मोठ्या प्रमाणात संपूर्ण खानदेशातून गर्दी झाली होती. शुभारंभ प्रसंगी प पु प्रसाद महाराज यांचेसह, भक्तराज महाराज मुल्हेर, ईश्वरदास महाराज नांदगाव,खासदार स्मिताताई वाघ,माजी नगराध्यक्ष सौ जयश्री अनिल पाटील, विनोदभैया पाटील, डॉ.अनिल शिंदे, प्रांत नितीन मुंडावरे,डीवायएसपी विनायक कोते पाटील,पोलीस निरीक्षक केदार बारबोले,दत्तात्रय निकम तहसीलदार रुपेश सुराणा,मुख्याधिकारी तुषार नेरकर,सौ राजश्री पाटील,भाजयुमो नेत्या भैरवी वाघ, योगेश महाजन, उदय देशपांडे, महेश कोठावदे, डीगंबर महाले, हरी भिका वाणी, दिलीप देशमुख, रवींद्र देशमुख, शितल देशमुख, प्रीतपाल बग्गा, गोपी कासार यासह पत्रकार बांधव नागरिक उपस्थित होते.

याशिवाय सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते.परंपरेप्रमाणे प्रत्येक समाज बांधवानी या रथोत्सवाची जबाबदारी सांभाळली. रथोत्सवाचा सोहळा पार पाडण्यासाठी गावातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली होती.रथात अनेक व्यायाम शाळेच्या लेझीम पथकांनी उपस्थिती देऊन शोभा वाढवली.अनेक मंडळांनी पाणी व थंड पेय वाटप केले.पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.
दरम्यान यंदा भविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदा रथ ओढण्यासाठी ट्रॅक्टरचाही आधार घेण्यात आला होता.सर्वांच्या सहकार्याने रथ उत्सव शांततेत पार पडला.


