
अमळनेर:- 16 जुन रोजी युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ बाबा हरदेव सिंह जी यांनी सन 1986 पासून सुरू केलेली रक्तदान अभियानाची हि मोहीम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहोचली आहे. मागील 4 दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 8644 शिबिरांमध्ये मिशन मार्फत 14,05,177 युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले . संत निरंकारी मिशन मध्ये दरवर्षी 24 एप्रिल पासून महा रक्तदान शिबीरास आरंभ होत असतो.

दि 14 जून वार शनिवार रोजी रक्तदान शिबिर जन जागृती साठी अमळनेर शहरात विशाल मोटर सायकल रॅली चे आयोजन करून जनजागृती करण्यात आलि. याचाच भाग म्हणून संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा अमळनेर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सत्संग भवन, चोपडा रोड सिंधी कॉलनी येथे दि १५ जून वार रविवार सकाळी ९.00 ते ४.00 यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीराचे उदघाटन हिरालाल पाटील यांच्या सह ग्रामीण भागातील सर्व साध संगत उपस्थित होते.
उपस्थित सामाजिक कार्यकर्ते यांनी संत निरंकारी मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रसंशा करत म्हणाले की मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमात जसे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, “स्वच्छ जल स्वच्छ मन”, वृक्षारोपण , नेत्र तपासणी इ. कार्यात योगदान देत आहे. एकुण 60 रक्तयुनिट संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी जळगाव येथील रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉक्टर्स व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या विशाल भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी चहा-पाणी, फळफळावळ, अल्पोपहार ,जेवनाची उचित व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीचंद दादा निरंकारी यांच्या सह सर्व साध संगत , सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

