
अमळनेर:- तालुक्यात गेल्या महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिके कोमजू लागल्याने भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषी विभाग, पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुकलेल्या पिकांची काही शेतात नजर पाहणी करण्यात आली.

यावेळी ज्वारी, बाजरी, उडीद, मुंग, कपाशी, तूर, आधी पिकांच्या उत्पन्नात ८० ते ९० टक्के घट झाल्याची दिसून आले. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात वावडे महसूल मंडळामध्ये या समितीद्वारे १० ते १५ टक्के शेतातली पिकांची नजर पाहणी पूर्ण करण्यात आली. यामध्ये प्रत्येक पिकाचे १० ते १२ शेतकऱ्यांचे पंचनामे महसूल, कृषी विभाग, विमा कंपनीचे अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी पूनम पाटील, तलाठी भूपेंद्र पाटील, विमा प्रतिनिधी तुषार चौधरी, ग्रामसेवक किरण लंकेश यांच्या उपस्थितीत शेतात पिकांची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी चिमणपुरी पिंपळेचे माजी सरपंच योगेश अशोक पाटील, युवराज डी पाटील,विनोद नाना पाटील, गोविंदा काशिनाथ चौधरी,जयवंतराव डी पाटील यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.




