
उत्कर्ष फाउंडेशनने वाढवला गरजुंच्या दिवाळीचा गोडवा..
अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूल येथे गरीब व गरजू मुलांना कपडे व मिठाई वाटून दिवाळीचा गोडवा वाढवण्याचा प्रयत्न उत्कर्ष-एक सामाजिक जाणीव फाउंडेशन, बदलापूर यांनी केला.
बदलापूर येथील उत्कर्ष – एक सामाजिक जाणीव, फाउंडेशन वाड्या वस्तीवरील मुलांना शैक्षणिक मदत तसेच मुलांना निवासी मोफत रहिवास व शिक्षण देण्याचे कार्य करीत असते. यावर्षी दीपोत्कर्ष उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बारा ठिकाणी 365 मुलांना दिवाळी फराळ व नवीन कपडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत शिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूलमध्ये शिकत असलेले गरीब व गरजू 40 मुला मुलींना नवीन कपडे , बुट व मिठाई वाटप करून त्यांचा दिवाळी गोडवा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन श्रीमती पुष्पलता अशोक पाटील ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उत्कर्ष – एक सामाजिक जाणीव फाउंडेशन, बदलापूरचे खजिनदार योगेश्वर पाटील सदस्य सुधाकर बोरसे, किरण पाटील, शालेय समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक खजिनदार योगेश्वर बोरसे यांनी केले. सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी मानले. यावेळी सागर साहेबराव पाटील व डी सी पाटील यांची मनोगते व्यक्त केले. गावातील असंख्य मान्यवर व विद्यार्थ्यांचे पालक तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ तसेच सार्वजनिक मित्र मंडळ शिरूड यांनी परिश्रम घेतले.

