
ऐन दिवाळीत तालुक्यातील तरुणांना मिळणार मार्गदर्शनाची मेजवानी…
उच्चपदस्थ अधिकारी करणार विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळ व सर्व विकास मंचतर्फे करियर संवाद वारीचे आयोजन करण्यात आले असून उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन विद्यार्थी व तरुणांना मिळणार आहे.
तरुणांना करिअर विषयक मार्गदर्शन, एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती, वर्ग ३ ची पदे यात तालुक्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी तालुक्याचे सुपुत्र असलेल्या अधिकारी वर्गाच्या वतीने ग्रामीण भागात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे, नागपूर महानगर विकास प्राधिकरण मंडळाचे उपसंचालक कपिल पवार, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे पवार, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार, उपअभियंता विजय भदाने, युनियन बँक मॅनेजर मयूर पाटील, स.पो. नि. लिलाधर पाटील, ए. पी. आय. गोपीचंद नेरकर, आर टी ओ स्वप्नील वानखेडे, डीएसओ विनोद धनगर, पीएसआय चांदणी पाटील, एसटीआय संदीप पाटील, पीएसआय भूषण पाटील, पीएसआय शरद सैदाणे, कर सहायक हर्षा साळुंखे, पीएसआय संदीप भोई, कर सहायक पूजा वानखेडे, लेखापरीक्षक प्रशांत पाटील, जळगाव पोलीस सुनील साळुंखे, चंदन पाटील, गणेश भदाने यांच्यासह नोबेल फाऊंडेशनचे संचालक जयदीप पाटील, डॉ. एस आर चौधरी, डॉ. एस ओ माळी, प्रा डॉ. विजय तूंटे, शिक्षक भैय्या पाटील यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
करियर संवाद वारीचे वेळापत्रक…
◆ दिनांक २२/१०/२०२२ शनिवार
१ जवखेडा येथे सकाळी ८.३० ते १०.३०
२ मांडळ येथे सकाळी ११.०० ते दुपारी १.००
३ जानवे दुपारी ३.०० ते ५.००
४ शिरूडसायं. ६.०० ते ९.००
◆ दिनांक- २३/१०/२०२२ रविवार
१ कन्हेरे सकाळी ८.३०.ते १०.३०
२ दहिवद सकाळी ११.०० ते दुपारी १.००
३ पातोंडा दुपारी २.०० ते. ५.००
४ खेडी प्रज सायं. ६.०० ते ९.००
◆ दिनांक २४/१०/२०२२ सोमवार रोजी
१) भरवस – सकाळी ८.०० ते.१०.३०
२) सानेनगर सकाळी ११.०० ते १.००
३) करणखेडे दुपारी २.०० ते ५.००
◆ दिनांक – २५/१०/२०२२ मंगळवार रोजी मारवड येथे सकाळी ८.३० ते १०.३० असे या कार्यक्रमाचे नियोजन असून मारवड येथे कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त तरुण व विद्यार्थ्यांनी हजेरी लावत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळ व तालुक्यातील विकास मंचांतर्फे करण्यात आले आहे.





