
अहिल्यादेवी ह्या राज्यकारभाराच्या उत्तम आदर्श:- आ. पाटील…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथे चौक सुशोभीकरणांतर्गत आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधण्यात आले. त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
दहिवद येथील ग्रामपंचायत चौकात मोक्याच्या ठिकाणी स्मारक निर्माण झाल्यामुळे गावातील धनगर बांधवांनी प्रवेश द्वारा जवळच आमदार अनिल पाटील यांना पिवळा फेटा, घोंगडी व काठी देऊन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या सुरुवातीला गावातील तरुणींनी पिवळा पोशाख परिधान करून हातात महादेवाची पिंड घेऊन आमदारांना असंख्य ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या उपस्थितीत सभामंडपात आणले. त्यावेळी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक तुळशीराम पाटील होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते तर डी ए धनगर, बन्सिलाल भागवत व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार कसा असावा याचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले असून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले. त्यांनी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला” असे उद्घाटक अनिल दादा पाटील यांनी मनोगतावेळी सांगितले. यावेळी मौर्य क्रांती संघाचे बन्सिलाल भागवत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अहिल्यादेवी होळकरांनी सती प्रथा बंद केली. डी ए धनगर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गावागावातील पायविहिरी आजही अहिल्यादेवींच्या कार्याची साक्ष देत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक तुळशीराम पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी खास धनगरी वेश परिधान केलेले आधार लांडगे व गुलाब धनगर, गोपीचंद शिरसाठ, रमेश देव शिरसाठ, चेतन देवरे, गावातील ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामकृष्ण धनगर, खंडू धनगर, संभाजी धनगर, अशोक धनगर, वासुदेव धनगर, रमेश धनगर, ज्ञानेश्वर धनगर, सुनील धनगर, संतोष धनगर, बाळासाहेब धनगर, रावसाहेब धनगर, गणेश धनगर, रामकृष्ण धनगर, सतीश धनगर, भालचंद्र धनगर, हरी धनगर, बापू धनगर, किरण धनगर, दत्तू धनगर, गणेश धनगर, सुरेश धनगर, विलास धनगर, संतोष धनगर, हेमंत धनगर, धिरज धनगर, सुहास धनगर, गौरव धनगर, प्रितम धनगर यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमानंतर खंडू राघो धनगर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.







