
अमळनेर:- येथील अंबऋषी टेकडीवर दि 25 ऑगस्ट रोजी सकाळी अमळनेर येथील एलआयसी शाखेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाखाधिकारी गोपाल सोलंकी यांनी सांगितले की, वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधता येतो, वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे, याविषयी माहिती देत वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. तसेच भारतीय आयुविमा महामंडळ हे प्रत्येक सामाजिक कामात सहभागी होत असते तरी सर्व एलआईसी एजंट व कर्मचारी वर्गाने प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहनही करण्यात आले. यावेळी सुमित कुमार, हिमांशु सिंग, तुषार झेंडे, सदानंद अहिरराव, अजय रोडगे,नितिन पाटील, राहुल शिरसाठ, अर्पणा मुळे, दीपाली वाघ, अश्विनी ब्राम्हणकर, केशव बडगुजर, विनोद बडगुजर,सुधीर पाटील, दयानंद माळी, संजय पाटील, संजय चौधरी, गौरव चौधरी, नीता माळी प्रमोद सोनार तर अंबऋषी टेकड़ी ग्रुपतर्फे अनिल वाणी, राजेन्द्र सोनार, तुळशिराम भदाने हेमंत पाठक, आशीष चौधरी, किरण कुमार,नरेश कांबळे, योगेश येवले, भरत सैंदाने, सुरेश भावसार,गौरव चौधरी, संजय पाटील, किशोर पाटील, रमेश इंगले, मंगल सिंह भोई, संदीप ईशी, अशोक बुळके सह आदि उपस्थित होते.




