
प्रताप महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी राबविला उपक्रम…
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाविदयालयाच्या परिसरातील ५० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

हा प्लास्टिक कचरा संकलन करून नगरपालिकेस जमा करण्यात आला. या अभियानास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर शिरोडे यांनी मार्गदर्शन केले. रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे, जिल्हा समनव्यक डॉ मनीष करंजे व विभागीय समनव्यक डॉ संजय शिंगाणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अवित पाटील व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.भाग्यश्री जाधव उपस्थित होते तसेच माजी स्वयंसेवक सागर कोळी, विदयार्थी प्रतिनिधी अमोल पाटील, अस्मिता बैसाने यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.