
अमळनेर:- राज्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने अमळनेर येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून भुमातेला नारळ फोडले.

तब्बल महिन्याभरापासून पाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकरी राजासह सर्व धर्मियांकडून पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले होते. अश्यातच परवापासून जोरदार पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथे भूमातेला नारळ फोडले. दरम्यान गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस पडावा म्हणून राज्यभरात सर्व धर्मीयांकडून कडून प्रार्थना असेल, नमाज असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने साकडे घालण्यात आले होते.पाऊस यावा यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी श्रावण सोमवार निमित्ताने कपिलेश्वर महादेवाला निघालेल्या कावड यात्रेत सहभागी होत पावसासाठी साकडे घातले होते.
संकटात असलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळाल्याचा आनंद…
संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात का होईना या पावसामुळे दिलासा मिळणार असून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती त्यावरही काही प्रमाणात हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.