
परीक्षेत अपयश आल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा…
अमळनेर:- तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील वीस वर्षीय तरुणाने परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल ४ ऑगस्ट रोजी घडली आहे.

इंद्रापिंप्री येथील ललित रंगराव पाटील (वय-२०) हा तरूण विद्यार्थी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय येथे एफवाय बीएस्सी वर्गात शिकत होता. आई बाहेगावी गेली असता दुपारच्या सुमारास याने आपल्या राहत्या घराला बाहेरून कुलूप लावून आत गळफास घेतला. आई दुपारी गावाहून परतल्यावर घर बंद अवस्थेत व बाहेरून कुलूप लावल्या स्वरूपात दिसल्याने याबाबत आजूबाजूला विचारणा केली. तसेच मोबाईल द्वारे ललितला संपर्क साधला असता मोबाईलचा आवाज घरातूनच आल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता ललित गळफास घेऊन लटकलेल्या स्वरूपात आढळल्याने आईने हंबरडा फोडला. नुकताच एफवायबीएसीचा निकाल लागला होता या परीक्षेत अपयश आल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा होत असून तरूण ललितच्या मृत्युने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.